|| श्रीविद्या अखंडमहायोग ||
श्रीविद्याअखंडमहायोग ही अध्यात्म मार्गातील अति प्राचीन अशी योग परंपरा आहे. हठ्योगापासून ते मंत्रयोगापर्यंत व इतरही सर्व साधनांना एकात्मिक व समन्वित स्वरुपात प्रगट करते. युगा-युगा पासून चालत आलेली ही दिव्य बोध परंपरा सांप्रत काळी श्री सद्गुरुदेव श्रीनिवासजी काटकर पुढे नेत आहेत.

दिव्य श्री माता, ती आपल्या मुलांवर विनाअट प्रेम करते.
तिचे दैवी बिनशर्त प्रेम अनुभवण्यासाठी आपण, तिच्या मुलांनी, पूर्ण अहंकाररहित शरणागतीने तिच्यावर बिनशर्त प्रेम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
- श्रीगुरुदेव
श्री गुरुदेव
प्रा. श्रीनिवास शामराव काटकर, त्यांच्या प्रशंसक, भक्त आणि शिष्य यांच्यात श्रद्धेने श्रीगुरुदेव म्हणून ओळखले जातात, ते एक महायोगी आणि एक महान तत्वज्ञ आहेत. आध्यात्मिक गुरु म्हणून ते श्रीविद्यामहायोगाच्या व्यावहारिक शास्त्रामध्ये पात्र, अध्यात्मिक साधकांचा वर्ग, जात, भाषा आणि लिंग विचारात न घेता मार्गदर्शन करीत आहेत. श्री गुरुदेव हे दिव्य आध्यात्मिक प्रेरणा आणि खर्या आधुनिक युगातील शाश्वत स्त्रोत आहेत.
श्रीविद्याअखंडमहायोग
आमच्या सद्गुरूनाथांच्या रूपाने आविष्कृत झालेले सच्चीदानंदाचे अनंत प्रज्ञान आणि अनंत निष्कामप्रेम हेच आमच्या जीवनाचे एकमेव प्रेरक व्हावेत हि प्रार्थना, औम.
आगामी कार्यक्रम
पुस्तके
श्रीविद्या अखंड महायोग सैद्धांतिक व ऐतिहासिक परिचय
श्रीविद्या म्हणजे काय? महायोग म्हणजे काय? अखंड महायोग आणि खंडयोग यांमध्ये नेमका गुणात्मक फरक कोणता आहे? तसेच या संप्रदायाची तात्त्विक आणि सैद्धांतिक भूमिका काय आहे, याचे स्पष्ट आणि सुसंगत विवेचन या ग्रंथामध्ये केले आहे.
नवरात्र महोत्सव स्वरूप आणि महत्त्व
या पुस्तिकेमध्ये नवरात्र महोत्सवाचे आध्यात्मिक स्वरूप, त्याचे महत्त्व आणि उपासनेचा क्रम अत्यंत स्पष्टपणे सांगितला आहे. नवरात्रीच्या पहिल्या तीन दिवसांत कोणत्या देवीची उपासना करावी, पुढील तीन दिवस कोणत्या देवीचे पूजन करावे आणि शेवटच्या तीन दिवसांत कोणत्या देवीची आराधना करावी, याचे सविस्तर मार्गदर्शन दिले आहे.
श्रीमद भगवद्गीता अध्याय बारावा - भक्तीयोग - गीतार्थ संजीवनी
पूज्य गुरुदेवांनी अर्जुनाच्या मनात निर्माण झालेल्या विषाद वृत्तीचे अत्यंत सूक्ष्म आणि महत्त्वपूर्ण विवेचन केले आहे. या विवेचनातून “अर्जुन होणे” म्हणजे काय, साधकाच्या अंतर्मनातील संघर्षाचे स्वरूप काय आणि त्या संघर्षातून ज्ञानप्राप्तीचा मार्ग कसा खुला होतो, हे वाचकांना समजते.



